विहंग प्रकरणावरून सोमैयांची सरकारवर टीका

विहंग प्रकरणावरून सोमैयांची सरकारवर टीका

विहंग प्रकरणावरून सोमय्यांची सरकारवर टीका सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई, ता. १२ : विहंग इमारतीसंदर्भात लोकायुक्तांसमोर कारवाईचे आदेश देऊन प्रत्यक्षात दंड माफ करीत नियमितता आणण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर भाजपनेते किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे. प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे आमदार असल्याने त्यांचे अवैध बांधकाम नियमित केले. आता परिवहनमंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट कायदेशीर करणार का? मिलिंद नार्वेकरांच्या बंगल्याला अभय का दिले नाही, असे प्रश्नही सोमय्या यांनी विचारले आहेत. २००८-२००९ मध्ये विहंग गार्डनचे अनधिकृत बांधकाम करीत ११४ सदनिकाधारकांची आमदार सरनाईक यांनी फसवणूक केली. याबाबतीत गेल्याच आठवड्यात लोकायुक्तांसमोरच्या सुनावणीत चूक झाल्याचे सरकारने मान्य केले; मात्र लगेचच मंत्रिमंडळात यासंबंधीचा निर्णय बदलला गेल्याने ठाकरे सरकारचे माफीचे धोरण स्पष्ट दिसते आहे. सरकारने आपल्या आमदाराला माफ करण्याचे धोरण स्वीकारले असले, तरी जनता या सरकारला माफ करणार नाही, असेही किरीट सोमय्या यांनी यासंबंधीच्या पत्रकात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com