ब्राह्मणांसाठी समाजभवन गरजेचे

ब्राह्मणांसाठी समाजभवन गरजेचे

Published on

वसई, ता. २४ (बातमीदार) ः ब्राह्मण समाज अनेक सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवतो; मात्र समाजाचे हक्काचे समाजभवन पालघर जिल्ह्यात उपलब्ध नाही, ही खंत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समाजभवन निर्मितीसाठी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. जेणेकरून समाजोपयोगी उपक्रमांना प्रोत्साहन मिळेल, असे आवाहन शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभेचे वसई तालुकाध्यक्ष अशोक पंडित यांनी केले.

शुक्ल यजुर्वेदीय माध्यंदिन ब्राह्मण सभेतर्फे वसई तालुक्यातील ज्ञाती बांधवांचा विद्यार्थी गुणगौरव व बक्षीस समारंभाचे आयोजन येथील समाजोन्नती मंडळ सभागृह माणिकपूर येथे करण्यात आले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोज पुरंदरे, कृष्णकुमार पंडित, अरुण वैद्य, सचिव अशोक पंडित, दीपक पंडित, ॲड. सुनील मोगरे, राजश्री वैद्य यांच्यासह ब्राह्मण समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी समाजातील ६९ विद्यार्थ्यांचा व ११ परीक्षकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी उपस्थितांचे आभार दीपक पंडित यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com