
अलिबाग, ता. १ : अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायत हद्दीतील भिसेवाडीत वर्षापासून पाण्याची समस्या होती, मात्र सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या पाठपुराव्यामुळे गावात नळाद्वारे पाणी मिळवण्यात यश आले आहे.
भिसेवाडीतील ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती. आता नळाद्वारे पाणी दारात आल्याने आनंदाचे वातावरण आहे. या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन किहीम ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच शिल्पा साळुंखे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य संतोष किर, गणेश भोईर, सदस्या कल्पिता आमले, अमिता वाघे, महेश नाईक, ग्रामविकास अधिकारी शेखर बळी आदी उपस्थित होते.
अलिबाग : किहीम भिसेवाडी येथे नळ पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन करताना माजी सरपंच शिल्पा साळुंखे, किहीम सरपंच पिंट्या गायकवाड व इतर मान्यवर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.