५४ हजार ५४५ लाभार्थ्यांना तंबी

५४ हजार ५४५ लाभार्थ्यांना तंबी

Published on

५४ हजार ५४५ लाभार्थ्यांना तंबी
रास्तभाव धान्य दुकानातून उचल करण्याची शेवटची संधी
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता.१६ : राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातर्गत अंत्योदय व प्राधान्य गट योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येते. पण रायगड जिल्ह्यातील ५४ हजार ५४५ लाभार्थ्या ई-केवायसी नसल्यामुळे लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थ्यांनी २० ऑक्टोबरपर्यंत रास्त भाव धान्य दुकानातून धान्याची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी केली आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये अंत्योदय अन्न योजनेच्या २,१०७ शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब योजनेच्या तब्बल ७०,४४२ लाभार्थींच्या धान्याचे वाटप होत नाही. सहा महिन्यांपासून १२,९४५ शिधापत्रिकाधारकांबरोबर ३४,७४५ लाभार्थींचा समावेश आहे. यामुळे जिल्ह्यासाठी मंजूर झालेल्या इष्टांकाचा मोठा भाग सध्या वापराविना शिल्लक असल्याने इतर जिल्ह्यांना वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संदर्भातील तक्रार रेशन दुकानदार संघटनेने शासनाकडे केली होती. त्यामुळे पुरवठा विभागाने दिवाळी निमित्त १०० टक्के धान्याची उचल व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
-------------------------
ई-केवायसी केली नसेल त्यांनी दुकानदाराकडे धान्य घेताना ई-केवायसी करुन घ्यावी. अशी नावे रेशन धान्य दुकानाच्या यादीतून वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर धान्य मिळणार नाही.
- सर्जेराव सोनावणे, जिल्हा पुरवठा अधिकारी-रायगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com