नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरसकट भरपाई द्या
नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून सरसकट भरपाई द्या
शेकापतर्फे सुधागड-पाली तहसीलदारांना निवेदन
पाली, ता. २९ (वार्ताहर) ः परतीच्या पावसामुळे भातशेतीच्या झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सुधागड तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन मंगळवारी (ता. २८) तहसीलदारांना देण्यात आले.
सुधागड तालुका चिटणीस अतिष सागळे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेकापचे नेते सुरेश खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुधागड-पाली तहसीलदार उत्तम कुंभार यांना निवेदन दिले. सुधागड तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सुधागड तालुक्यातील शेतकरी हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे; मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाताशी आलेले भाताचे उभे पीक जमीनदोस्त झाले. शेतकऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधन हे शेती असल्यामुळे त्यांचे शासनाकडून तातडीने नुकसानीचे पंचनामे करून सरसकट त्यांना आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात शेकाप नेते सुरेश खैरे यांनी तहसीलदार उत्तम कुंभार यांना सखोल माहिती दिली व वास्तव परिस्थिती सांगितली. या वेळी सुधागड तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन किसन उमटे, सुधीर साखरले, तालुक्यातील शेतकरी तसेच सुधागड शेकाप पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

