बळीराजा पावसापुढे हतबल

बळीराजा पावसापुढे हतबल

Published on

बळीराजा पावसापुढे हतबल
आडवे झालेले भातपीक पुन्हा उगवले
पाली, ता. २ (वार्ताहर) ः वादळी पावसाने रायगड जिल्ह्यातील भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. शेतामध्ये आडवे पडलेले भातपीक मुसळधार पावसाने जमिनीत रुजली असून नव्याने रोपे उभी राहिली आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशांवर पाणी फेरले आहे.
परतीचा पाऊस रोज धुमाकूळ घालत आहे. पावसाने उसंत घेतली नसल्याने शेतकऱ्यांना उरलेला भात काढणे अशक्य झाले आहे. भात काढून ठेवला तरी मळणी, झोडणी करण्याचा शेतकऱ्यांना भेडसावत आहे. परिणामी, आहे त्या स्थितीत शेतामध्ये भात ठेवला आहे; मात्र पाऊस, वाऱ्यामुळे उभे पीक शेतातच आडवे झाले आहे. काही ठिकाणी मोठी रोपे उगवली आहेत. तर काही ठिकाणी काढलेला भात कुजला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्या भाताचा उपयोग होणार नसल्याने हतबल झाल्याची भावना आहे.
------------------------------------
पंचनामे करण्यासाठी धडपड
परतीच्या पावसामुळे दयनीय अवस्था झाली आहे. अशा परिस्थितीत पंचनामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या मोबाईलवर जीपीएस कॅमेऱ्यामधून फोटो आणा, असे उत्तर कृषी विभागाकडून मिळत आहे. शेतात काम करणारा शेतकरी, अशा प्रतिकूल परिस्थितीत मोबाईलवर जीपीएस कॅमेऱ्यातून फोटो काढणार हाच मुळात संशोधनाचा विषय आहे, त्यामुळे कृषी, महसूल विभाग उदासीन असल्याचे दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com