वरूणराजामुळे चिंता वाढली

वरूणराजामुळे चिंता वाढली

Published on

वरुणराजामुळे चिंता वाढली
तीन दिवस पुन्हा बरसणार, सरकारी यंत्रणा अलर्ट
महाड, ता. २४ (बातमीदार) ः मेपासून सुरू असलेल्या पावसाने अजूनही परतीची वाट धरलेली नाही. अशातच हवामान विभागाने २७ ते २९ सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पुन्हा चिंतेत सापडला आहे.
मेमध्येच पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीची कामे खोळंबली होती. पेरणी उशिरा सुरू होऊन भातरोपांवर येत असतानाच पावसाने पुन्हा जोर धरला. आता शेती तरारली असताना पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी (ता. २७) ते सोमवार (ता. २९)पर्यंतच्या कालावधीमध्ये कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिवृष्टीची शक्यता आहे. या काळात स्थानिक प्रशासनाने सतर्क राहावे, अशी सूचना हवामान विभागाने केली आहे. महाड तहसीलदारांनी तसे आदेश बजावले आहेत. तसेच शनिवार, रविवार सुट्टी असल्याने शासकीय कर्मचाऱ्यांना कार्यान्वित राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
----------------------------------
पिकांच्या नासाडीची भीती
रायगड जिल्हा हा आपदग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. अनेक गावांमध्ये पूर येणे, दरड कोसळणे अशा आपत्ती घडत असतात. तीन दिवसांच्या इशाऱ्यामुळे सरकारी यंत्रणा अलर्ट झाली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना उभ्या पिकांच्या नासाडी होण्याची भीती आहे.
------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com