मुंबईकडे पावसाची पाठ; आर्द्रता मात्र वाढली;

मुंबईकडे पावसाची पाठ; आर्द्रता मात्र वाढली;

Published on

पावसाने पाठ फिरवल्याने
मुंबईकर घामाने चिंब

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : चारपाच दिवस संततधार कायम ठेवणाऱ्या पावसाने सोमवारी पाठ फिरवल्याने मुंबईकर घामाच्या धारांनी चिंब झाले. दिवसभरात केवळ दीड मिलोमीटर पावसाची नोंद झाली. त्यातच आर्द्रतेत वाढ झाल्याने उकाड्यात मोठी वाढ झाली. मुंबईत कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सियस नोंदवण्यात आले; तर आर्द्रता ७८ टक्क्यांच्या वर होती.
कुलाबा येथेही कमाल तापमान ३१.४ अंश सेल्सियस; तर आर्द्रता ८३ टक्के नोंदवली गेली. सकाळच्या सत्रात आर्द्रता काही वेळ १०० टक्क्यांवर गेल्याचे मुंबई वेदरने म्हटले आहे. दरम्यान, प्रादेशिक हवामान विभागाने आज मुंबईत ग्रीन अलर्ट दिला होता; तर पुढे ५ ते ७ जुलै दरम्यान यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे आणखी तीन दिवस पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता असून मुंबईकर उकाड्याने आणखी त्रस्त होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.