बीएसस्सी आयटी सत्र ६चा निकाल जाहीर

बीएसस्सी आयटी सत्र ६चा निकाल जाहीर

बीएससी आयटी सत्र ६चा निकाल जाहीर
मुंबई, ता. ८ : मुंबई विद्यापीठाने एप्रिल २०२४ मध्ये घेतलेल्या प्रथम सत्र म्हणजेच उन्हाळी सत्रातील तृतीय वर्ष बीएससी आयटी सत्र ६ या परीक्षेचा निकाल जाहीर केला. या परीक्षेत ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी ७६.६० एवढी आहे. विद्यापीठाने बीएससी आयटीबरोबरच बीए एमएमसी, वाणिज्य, विज्ञान, व्यवस्थापन व मानव्यशाखेचा निकालही ३० दिवसांच्या आत जाहीर केला आहे. या परीक्षेत ७,८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर ७,६९५ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यामध्ये ४,५२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर १,३८१ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या परीक्षेचा निकाल ७६.६० टक्के एवढा लागला आहे. १८० विद्यार्थी हे परीक्षेला अनुपस्थित होते. ३२ विद्यार्थ्यांचे निकाल हे कॉपी प्रकरणामुळे राखीव ठेवण्यात आले आहेत. तर ८१४ विद्यार्थ्यांचे निकाल ते प्रथम किंवा द्वितीय वर्ष उत्तीर्ण नसल्याने राखीव ठेवण्यात आले आहेत. तसेच विविध कारणांनी प्रवेश निश्चित न झाल्याने ९४८ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com