राज्यात डेंग्यूचा विळखा
राज्यात डेंगीचा विळखा
सहा महिन्यांत २,०३१ रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः राज्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच डेंगीने जोर पकडला असून १ जानेवारी ते १६ जून २०२५ या कालावधीत २,०३१ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सर्वाधिक ३९५ रुग्ण आढळून आले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने ही माहिती दिली असून, यंदाच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांतच वाढलेली रुग्णसंख्या आरोग्य यंत्रणांसाठी चिंतेची ठरत आहे. महापालिकानिहाय आकडेवारीनुसार, अकोला (१३९), नाशिक (१३२), मालेगाव (६६), ठाणे (६३) आणि कल्याण (३३) येथे रुग्ण आढळले आहेत. जिल्हानिहाय आकडेवारीनुसार, पालघर (१३३), पुणे (१२८), अकोला (११९), सिंधुदुर्ग (६६), सातारा (५०), यवतमाळ (४६) आणि नागपूर (३४) जिल्हे डेंगीग्रस्त आहेत. पाच वर्षांतील आकडेवारी पाहता, २०१९ मध्ये १४,८८८ रुग्ण आणि ४९ मृत्यू, तर २०२४ मध्ये १९,३८५ रुग्ण व ४० मृत्यूंची नाेंद झाली आहे. यंदा अद्याप मृत्यूची नोंद नाही, हे दिलासादायक असले तरी पावसाळ्याच्या प्रारंभीच रुग्णसंख्या वाढल्याने संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे.
डेंगी हा ‘एडीस इजिप्टाय’ मादी डासांमुळे पसरतो. सर्वेक्षणात ८० टक्के रुग्णांच्या घरात किंवा आसपास डासांची उत्पत्ती झाल्याचे आढळले आहे. पाण्याचे पिंप, फेंगशुई झाडे, वातानुकूलित यंत्रणांतील पाणीसाठ्यांमध्ये डासांची अंडी आढळून आली आहेत. आठ दिवसांच्या कालावधीत डासांची उत्पत्ती होत असल्याने ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.