विमान प्रवाशांनो, लवकर पोहोचा!
विमान प्रवाशांनो, लवकर पोहोचा!
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई परिसरात गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पाणी साचून वाहतूक कोंडी झाल्याने इंडिगो आणि अकासा एअरने रविवारी (ता. १७) मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या प्रवाशांना नेहमीपेक्षा लवकर पोहोचण्याचे आवाहन केले.
इंडिगोने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले आहे, की मुंबईच्या मोठ्या भागांवर पावसाचा परिणाम होत आहे आणि विमानतळाकडे जाणाऱ्या काही रस्त्यांवर पाणी साचल्याने विलंब होत आहे. जर तुमची फ्लाइट असेल तर कृपया नेहमीपेक्षा लवकर निघा आणि आमच्या ॲप किंवा वेबसाईटवर तुमच्या फ्लाइटची स्थिती तपासा. ओल्या रस्त्यावर प्रवास करताना काळजी घ्या. अकासा एअरने त्यांच्या पोस्टमध्ये, ‘मुसळधार पावसामुळे विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूक संथगतीने सुरू असून गर्दी होण्याची शक्यता आहे. सुरळीत प्रवास करण्यासाठी तुमच्या फ्लाइटसाठी विमानतळावर वेळेवर पोहोचण्यासाठी अतिरिक्त प्रवास वेळेचे नियोजन करा,’ असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.