खासगी जलमापक नियमांत बदल
मुंबईकरांचे पाणी महागणार
महापालिकेचे खासगी जलमापक नियमांत बदल
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : महापालिकेने खासगी पाण्याच्या मीटरसंदर्भातील नियमांत मोठे बदल केले आहेत. याची लवकरच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जलमापक नादुरुस्त असल्यास १०० टक्के वाढ, तर जलमापकाचे वाचन उपलब्ध नसल्यास २५ टक्के वाढ आकारण्यात येणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पाणीबिलावर वाढीव आकारणी टाळण्यासाठी बंद किंवा नादुरुस्त जलमापक त्वरित बदलण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.
जल आकार नियमावली आणि मलनिःसारण व टाकाऊ पदार्थ निष्कासन नियमावली २०१५मधील नियमांमध्ये सुधारणा करून ही पद्धत लागू केली आहे. पालिकेच्या नव्या नियमानुसार, खासगी जलमापक (मीटर) सहा महिन्यांहून अधिक काळ नादुरुस्त असल्यास अंदाजित पाणी वापर ठरवून त्यावर थेट १०० टक्के अधिक वाढ केली जाणार आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी जलमापक वाचनास उपलब्ध नसतात किंवा ते काही ठिकाणी जमिनीत गाडलेले असतात. अशा वेळी पाण्याची दैनंदिन गरज किंवा मागील वापर याच्या आधारे अंदाजित वापर ठरवून त्यावर २५ टक्के वाढ आकारली जाईल.
झोपडपट्टी भागातील जलमापकांवरही नवे नियम
झोपडपट्टीतील निवासी खासगी जलमापक १२ महिन्यांहून अधिक काळ नादुरुस्त असल्यासदेखील हाच नियम लागू राहणार आहे. यामुळे नागरिकांना वेळेत मीटर दुरुस्त करणे किंवा नवीन बसविणे आवश्यक राहणार आहे. महापालिकेने सर्वसामान्य नागरिक, सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच झोपडपट्टीतील रहिवाशांना स्पष्ट इशारा दिला आहे, की बंद किंवा नादुरुस्त जलमापक त्वरित बदलून घ्यावेत अन्यथा पाणीबिलावर वाढीव आकारणी केली जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.