वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याला स्थानिकांचा विरोध
वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याला स्थानिकांचा विरोध
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिक व संघटनांकडून तीव्र विरोध होत असून, मुंबई महापालिकेला आता या निर्णयाचा फेरविचार करावा लागणार आहे. केवळ सात वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये उभारण्यात आलेल्या या उड्डाणपुलावर तब्बल २७ कोटी रुपये खर्च करण्यात आला होता.
वीर सावरकर उड्डाणपूल हा पूल पश्चिम द्रुतगती महामार्गाला थेट जोडतो. या पुलामुळे गोरेगाव-मालाड परिसरातील प्रवासाचा वेळ ४५ मिनिटांवरून अवघ्या १० मिनिटांवर येतो; मात्र कोस्टल रोड प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी हा पूल अडथळा ठरत असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे पुलाच्या जागी दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. दुसरीकडे स्थानिक नागरिकांचा दावा केला आहे की, ‘उड्डाणपूल पाडल्यास परिसरातील वाहतूक व्यवस्था कोलमडेल आणि प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागेल.’ या पार्श्वभूमीवर आमदार विद्या ठाकूर यांनी पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र देऊन पर्यायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. एवढ्या कमी कालावधीत बांधलेला उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय आहे. नवीन पूल उभारणे गरजेचे असेल, तर पर्यायी आराखडा तयार करावा, असे स्थानिक लोकप्रतिनिधींना स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.