पावसाळ्यानंतर मिठीच्या विकासाचे काम वेगात
पावसाळ्यानंतर मिठीच्या विकासाचे काम वेगात
तिसऱ्या टप्प्यातील कामासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ ः मिठी नदीच्या विकासाचे काम पावसाळ्यानंतर वेगाने सुरू होणार असून, नदीच्या विकासकामाबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून निविदा प्रक्रियेत अडकलेला हा टप्पा आता नव्या आराखड्यानुसार राबवला जाणार आहे. पालिकेने तिसऱ्या टप्प्यातील जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक आणि प्रोमेनेड यांसारखी सौंदर्यीकरणाची कामे वगळली आहेत. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च लक्षणीय घटला आहे. पालिकेने नव्याने निविदा प्रक्रिया सुरू केली असून, निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पालिकेच्या सूत्राने दिली.
मिठी नदी विकास प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्याला अखेर वेग येणार आहे. या टप्प्यात भरतीप्रवण क्षेत्रातील मिठी नदी व वाकोला नदीत मिसळणारे सांडपाणी अडवून ते नियोजित मलनिस्सारण वाहिन्यांमार्फत मुख्य वाहिनीत वळवणे, उर्वरित ३०० मीटर नदीचे रुंदीकरण व खोलीकरण, संरक्षक भिंती, सेवा रस्ते, पूरनियंत्रण दरवाजे बांधणे आणि ८,८५० मीटर लांबीच्या विहारक्षेत्राची उभारणी आदी कामांचा समावेश आहे. पावसाळ्यानंतर ही कामे वेगाने सुरू होणार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. गेल्या ऑक्टोबर २०२३ पासून विविध प्रक्रिया सुरू आहे.
पुराची तीव्रता होणार कमी
मिठी नदीच्या पुराची तीव्रता कमी करण्यासाठी तिसरा टप्पा महत्त्वाचा मानला जात आहे. आता नव्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने हे काम वेगाने सुरू होईल आणि मिठीलगतच्या लोकांना दिलासा मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.