मतचोरी रोखण्यासाठी ‘टपाली मोजणी’ सुधारणा
मतचोरी रोखण्यासाठी ‘टपाली मोजणी’ सुधारणा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.२५ : निवडणुकीत मतदारांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आणि मतचोरीला आळा घालण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने टपाली मतपत्रिकांच्या मोजणी प्रक्रियेत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. गेल्या काही निवडणुकांमध्ये टपाली मतपत्रिकांची मोजणी उशिरा पूर्ण होत असल्याने पारदर्शकतेबाबत शंका निर्माण होत होती. आता आयोगाने ही शंका कायमची दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतमोजणीच्या दिवशी सकाळी ८ वाजता टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू होईल. यानंतर सकाळी ८.३० वाजता ईव्हीएम मोजणी सुरू होईल, मात्र ईव्हीएम/व्हीव्हीपॅटची शेवटून दुसरी फेरी टपाली मतपत्रिकांची मोजणी पूर्ण होईपर्यंत थांबवावी लागेल. यामुळे एकाही मतदाराचा आवाज दाबला जाणार नाही, तसेच कोणतीही घाई-गडबड होऊन मतचोरीची शंका निर्माण होणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. दिव्यांग मतदार आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाची सुविधा दिल्यामुळे टपाली मतपत्रिकांची संख्या अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीत सुसंगती राखण्यासाठी आणि गैरसमज टाळण्यासाठी हे सुधारित नियम लागू करण्यात आले आहेत. ज्या मतदारसंघांमध्ये टपाली मतपत्रिका अधिक आहेत, तिथे पुरेसे टेबल आणि मोजणी कर्मचारी नियुक्त करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. ‘प्रत्येक मताची किंमत समान आहे. मतदारांचा विश्वास अबाधित ठेवणे हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे,’ असे आयोगाच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.