सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन

Published on

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन
मुंबई, ता. २६ ः मराठवाडा, सोलापूर, धाराशिवसह विविध भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जगाचा पोशिंदा संकटात सापडला आहे. या संकटाच्या काळात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी केले आहे. शासन मदत करत असले तरी समाजाने यात सक्रिय सहभाग नोंदवणे हेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे दहिबावकर यांनी सांगितले. गणेशोत्सव मंडळांनी थेट वस्तू स्वरूपात शेतकरीबांधवांना मदत करावी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीत यथाशक्ती योगदान द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पूरग्रस्त भागांमध्ये सध्या अन्नधान्य, कपडे, औषधे व आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणात गरज असून, गणेश मंडळांनी सढळ हस्ते मदत करावी, असे समन्वय समितीकडून आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com