२०३० पर्यंत मुंबई रेबीजमुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प

२०३० पर्यंत मुंबई रेबीजमुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प

Published on

२०३०पर्यंत मुंबई रेबीजमुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प
मुंबई, ता. २७ ः मुंबईला २०३०पर्यंत रेबीजमुक्त शहर करण्यासाठी महापालिकेचा संकल्प आहे. ‘मुंबई रेबीजनिर्मूलन मोहिमे’अंतर्गत लसीकरण, जनजागृती आणि आरोग्य शिक्षण सत्रे राबवली जात आहेत. वर्ष २०२३ पासून आतापर्यंत एक लाखाहून अधिक श्वानांचे लसीकरण करण्यात आले आहे. यासाठी जीपीएस ट्रॅकिंग व डब्ल्यूव्हीएस अ‍ॅपसारख्या डिजिटल साधनांचा वापर होत आहे. भटक्या प्राण्यांचे निर्बीजीकरण, शाळा व समाजपातळीवरील जनजागृती उपक्रम यामुळे मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढली आहे. मुंबईत १६३ अँटी-रेबीज लसीकरण केंद्रे कार्यरत असून, कस्तुरबा रुग्णालयात रेबीज रुग्णांसाठी विशेष कक्ष आहे. रेबीज प्रतिबंध हा सामूहिक प्रयत्नांचा विषय आहे. नागरिकांनीही सहभागी होऊन २०३०पर्यंत रेबीजमुक्त मुंबई घडवावी, असे आवाहन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केले. लसीकरण, जनजागृती आणि सामूहिक प्रयत्नांमुळे रेबीजवर मात शक्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com