‘अमृत संवाद’मधून प्रवाशांशी थेट संवाद
‘अमृत संवाद’मधून प्रवाशांशी थेट संवाद
मुंबई विभागाचा पुढाकार; रेल्वे प्रवाशांचा उत्स्फूर्त सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘अमृत संवाद’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. गुरुवारी मुंबई सेंट्रल स्थानकाच्या कॉनकोर्स भागात पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रवाशांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचा उद्देश प्रवासी आणि रेल्वे प्रशासन यांच्यात थेट संवाद घडवून आणणे, प्रवासी सुविधांबाबत कल्पना, सूचना आणि अडचणी अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवणे हा होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंह यांनी केले. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह प्रवाशांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांचे प्रश्न ऐकून घेतले. प्रवाशांनी सुरक्षा, स्थानकांवरील सुविधा, डब्यांतील सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रीमियम स्लीपर एक्सप्रेस गाड्यांच्या सुरुवातीसंदर्भात प्रश्न उपस्थित केले.
‘अमृत संवाद’ या उपक्रमाचा उद्देश नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक बळकट करणे आणि प्रवाशांच्या सूचनांना प्रत्यक्ष कृतीत रूपांतरित करणे हा आहे. हा उपक्रम अमृतकाल आणि पंचप्राण या संकल्पनांनी प्रेरित असून, २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.
प्रवाशांच्या सहभागातून सुधारणा
सिंह यांनी प्रवाशांचे प्रत्येक प्रश्न संयमाने ऐकले आणि रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी स्वच्छता राखणे, जबाबदार प्रवास करणे आणि रेल्वेच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.