भारताचे चरित्र आणि चारित्र समजून घेणे अत्यावश्यक
भारताचे चरित्र आणि चारित्र्य समजून घेणे अत्यावश्यक
‘भारत’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात डॉ. सदानंद मोरे यांचे वक्तव्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १५ : प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर येथे ‘भारत’ या हर्षद माने लिखित पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (ता. १५) करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि संत वाङ्मयाचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भारताचे चरित्र आणि चारित्र्य सखोलपणे समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ‘आपला देदीप्यमान इतिहास, संस्कृती आणि मूल्यव्यवस्था जाणून घेण्यासाठी उपलब्ध दर्जेदार साहित्याचा अभ्यास अनिवार्य आहे,’ असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले.
डॉ. सदानंद मोरे यांनी ‘भारत’ या पुस्तकाच्या वैशिष्ट्यांवर भाष्य करताना सांगितले, की ‘भारत’ वाचताना प्राचीन भारताचा विस्तृत पट डोळ्यांसमोर उभा राहतो. शुंग, मौर्य आणि सातवाहन युगाचा विस्तार, कालीदासाचे नाट्यकाव्य, प्राकृत व मराठी भाषेचा विकास तसेच आशिया-युरोप व्यापारमार्गातील बदल याचे अनुशीलन पुस्तकात प्रभावीपणे आले आहे. भारताच्या घडणीत महाराष्ट्राचा वाटा काय, हा विचारही पुस्तक वाचकांसमोर स्पष्ट ठेवते. यानिमित्ताने आयोजित चर्चासत्रात विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांनी सहभाग घेतला होता. ज्येष्ठ पत्रकार आणि पुरातत्त्वज्ञ विनायक परब यांनी भारतीय युद्धशास्त्रावर, डॉ. अनिता राणे कोठारे यांनी भारतीय कला व स्थापत्यावर, तर डॉ. मंजिरी भालेराव यांनी नाणी व शिलालेखांच्या आधारे भारताच्या इतिहासावर प्रकाश टाकला. या वेळी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

