पहिलीपासून तिसरी भाषा नकोच !
पहिलीपासून तिसरी भाषा नकोच!
साहित्यिक, विचारवंत, मानसोपचारतज्ज्ञांचा विरोध
मुंबई, ता. ९ ः शालेय शिक्षणात पहिलीपासून त्रिभाषा धोरणाचे सूत्र लागू करण्यासाठी माजी कुलगुरू व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला समितीला राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, मान्यवरांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शविला आहे. राज्यात कोणत्याही स्थितीत पहिलीपासून हिंदी आणि इतर कोणतीही त्रिभाषा लागू करू नये, यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतात, असे सांगत विविध मान्यवरांनी त्रिभाषा धोरणाच्या सूत्रालाच आपला विरोध दर्शविला आहे. काही मान्यवरांनी यावर पर्याय सुचवून राज्यातील मराठी शाळांच्या दुरवस्थेबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.
प. बा. सामंत शिक्षण समृद्धी प्रयास आणि शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीतर्फे राज्यातील विविध तज्ज्ञांकडून डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या संदर्भात मते, प्रतिक्रिया मागवण्यात आल्या होत्या. त्यावर विविध तज्ज्ञांकडून अनेक महत्त्वपूर्ण मते, सूचना आणि प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांनी पहिलीपासून हिंदी सक्तीची असू नये, अशी ठाम मागणी केली आहे. ते म्हणतात, पहिली भाषा वयाच्या (सुमारे) तीन वर्षांपर्यंत अवगत होते, तर नंतर इतर भाषा शिकता येतात. पहिल्या भाषेचा भर ओसरल्यानंतर म्हणजे वयाच्या १०-१२ वर्षांपर्यंत नंतर, पहिली भाषा बऱ्यापैकी रुळल्यानंतर, बौद्धिक समज वाढल्यानंतर, सहजपणे शिकता येते. यामुळे पहिलीपासूनच मुलांवर त्रिभाषा लादणे योग्य नसल्याचे पानसे म्हणाले. इयत्ता सहावीपासून तिसरी भाषा शिकवायला सुरुवात करावी. इयत्ता दहावीपर्यंत तिसऱ्या भाषेत हिंदीबरोबरच कोणतीही भारतीय भाषा, संस्कृत किंवा पालीसारखी अभिजात भाषा किंवा परकीय भाषा घेण्याची सवलत असावी. एकापेक्षा अधिक भाषा प्रथम भाषा म्हणून घेण्याची सोय असावी, असे माजी शिक्षण संचालक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे यांनी म्हटले आहे.
...
दबाव आल्यास...
नीलेश निमकर म्हणतात, लहान मुले त्यांच्या परिसरात नैसर्गिकरीत्या बोलल्या जाणाऱ्या भाषा सहज आत्मसात करतात. शाळेची भाषा चांगली शिकण्यासाठी चार-पाच वर्षे लागतात. अशा वेळी तिसरी भाषा शिकवण्याचा दबाव आल्यास मुलांची मूळ भाषा आणि माध्यमाची भाषा दोन्ही कमकुवत होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याचे ते म्हणतात.
...
दोन भिन्न प्रक्रिया
शिक्षणतज्ज्ञ किशोर दरक म्हणतात, घरात न बोलली जाणारी भाषा तोंडी शिकणे आणि तिची लिपी शिकणे या दोन प्रक्रिया पूर्णपणे भिन्न आहेत. लिपी शिकण्यासाठी मातृभाषेचा मजबूत आधार आवश्यक असल्याने त्रिभाषा सूत्र राबवताना हा मूलभूत फरक लक्षात घेणे गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
...
यांनी नोंदवल्या प्रतिक्रिया
डॉ. मंजिरी निंबकर, धनवंती हर्डीकर, डॉ. श्रुती पानसे, शुभदा जोशी, मानसी महाजन, संजीवनी कुलकर्णी, विनोदिनी काळगी, सुचिता पडळकर, वंदना भागवत, वैशाली गेडाम, पल्लवी शिरोडकर, विद्या पटवर्धन, हेमांगी जोशी यांच्यासह डॉ. मॅक्सिन बर्नसन, सुषमा शर्मा, डॉ. रेणुका ओझरकर आणि डॉ. अविनाश पांडे, भाऊसाहेब चासकर, सुजाता पाटील, राजन इंदुलकर आणि मुग्धा नलावडे यांनीही प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

