उचाटमध्ये ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व

उचाटमध्ये ग्रामविकास आघाडीचे वर्चस्व

वाडा, ता. ३ (बातमीदार) : तालुक्यातील उचाट ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून असलेली प्रशासकीय राजवट हटवून ग्रामविकास आघाडी पॅनेलने आपला झेंडा रोवला आहे. यात नुकत्याच झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सरपंचपदी मानसी घोरकणे तर उपसरपंचपदी आशिष मोरे यांची निवड झाली आहे.
गेल्या १८ डिसेंबरला उचाट ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीने घवघवीत यश संपादन केले होते. या निवडणुकीत ग्रामविकास आघाडीचे सरपंच, उपसरपंचासह स्वाती मोरे, महेंद्र घोरकणे, संदीप पारधी हे सदस्य ही निवडून आले आहेत. गेली दहा वर्षे या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय राजवट होती. पण आता प्रशासकीय राजवट दूर होऊन आता लोकशाही मार्गाने जनहिताची आता कामे करता येतील, अशी आशा नवनिर्वाचित उपसरपंच आशिष मोरे आणि ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com