एसटीच्या प्रस्तावाला 
अर्थ विभागाचा हरताळ

एसटीच्या प्रस्तावाला अर्थ विभागाचा हरताळ

मुंबई, ता. १२ : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच दर महिन्याचे वेतन ७ ते १० तारखेदरम्यान देण्याचे सरकारच्या वतीने त्रिसदस्यीय समितीने न्यायालयात मान्य केले होते, परंतु या महिन्याची १२ तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने कर्मचाऱ्यांना वेतन मिळाले नाही. याप्रकरणी मंत्रालयातील अर्थ विभागातील अधिकारी हे सरकारला जुमानत नाहीत, असा आरोप एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ७ तारखेला वेतन मिळते, परंतु आता १२ तारीख उलटूनही वेतन मिळालेले नाही. शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून कामगारांची पीएफ, ग्रॅच्युईटी, बँक कर्ज आदी ९७८ कोटी रुपयांची रक्कम थकली आहे. तसेच वेतनावर अवलंबून असलेल्या विविध संस्था अडचणीत आल्या आहेत; मात्र त्याबाबत अर्थ विभाग गंभीर नसल्याचे बरगे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com