जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद

जलवाहिन्या फुटल्यामुळे पाणीपुरवठा बंद

Published on

बोर्डी, ता. ९ (बातमीदार) : बोर्डी ग्रामपंचायत क्षेत्रातील धुंडिया पाडा, ताडीया पाडा, भरवाड पाडा, लाव्हरी पाडा भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्यामुळे मागील सहा दिवसांपासून पाणीपुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
बोर्डी येथे सात कोटी रुपये खर्च करून राबवण्यात आलेली जलस्वराज्य योजना कुचकामी ठरल्यामुळे ३० वर्षांपूर्वी राबवण्यात आलेल्या तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेचे पाणी नळाद्वारे धुंडिया पाडा, लाव्हरी पाडा, भरवाड पाडा इत्यादी परिसरात केला जातो. सध्या लाव्हरी पाडा ते धोडी पाडामार्गे भाटाळी रस्त्याचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी बांधकाम साहित्य आणणाऱ्या अतिवजनाच्या ट्रकमुळे भूमिगत जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्यामुळे पाणीपुरवठा बंद पडला आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. लाव्हरी पाडा व ताडिया पाड्यांमध्ये विहिरीचे पाणी पिण्यास योग्य नसल्यामुळे ग्रामस्थांना आरोचे पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.