आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव

आमदार राजू पाटील यांनी मांडले पाणीसमस्येचे वास्तव

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ : कल्याण-डोंबिवली शहरात पाणीटंचाईची समस्या भीषण आहे. पाण्यासाठी दररोज नागरिक मोर्चे काढत आहेत. नवी मुंबईतील मोरबे धरणातील १४० दशलक्ष लिटर पाणी कोटा मंजूर झाला होता; मात्र अद्याप तो वर्ग करण्यात आला नाही. २७ गावांसाठी अमृत योजनेअंतर्गत काम सुरू आहेत. १०५ एमएलडी पाणी कोटा येथे देण्यात येणार होता; मात्र प्रत्यक्षात ६५ एमएलडी पाणी देण्यात येत आहे. वाढत्या शहरीकरणासाठी हा पाणी कोटा पुरेसा नाही, असे म्हणत कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी अधिवेशनात केडीएमसीमधील पाणीटंचाईचे वास्तव मांडले. तसेच मंजूर पाणी कोटा देता येत नसेल, तर येथे नव्याने होत असलेल्या बांधकामांच्या परवानग्या थांबवणार का, असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला. यावर पूर्ण कोटा कसा देता येईल, याविषयी सूचना एमआयडीसीला केल्या असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com