मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन

मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी निवेदन

विरार, ता. १० (बातमीदार) : घटत चाललेल्या मासळी उत्पादनामुळे मच्छीमारांसाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी-सुविधांची कमतरता व डिझेलच्या वाढत चाललेल्या किमतीमुळे मच्छीमारीचा व्यवसाय डबघाईला आला आहे. वाढते प्रदूषण व अद्यावत यांत्रिक बोटींचे आक्रमण यामुळे पारंपरिक पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या स्थानिक मच्छीमारांचा व्यवसाय धोक्यात आलेला आहे. यासाठी शासनाने मदत करावी, या मागणीसाठी बविआच्या शिष्टमंडळाने मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीरजी मुनगंटीवार यांची भेट घेतली.
पालघर जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर आणि बोईसरचे आमदार राजेश पाटील यांच्या शिष्टमंडळाने मत्सव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन त्यांना मच्छीमारांच्या विविध समस्यांचे निवेदन दिले. या निवेदनात त्यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये मासळीच्या दुष्काळात मच्छीमारांना सन्माननीय पॅकेज तसेच मच्छीमार सहकारी संस्थांच्या सुनियोजित सबलीकरणासाठी मच्छीमार संस्थांना विशेष पॅकेज देण्यात यावे. किनारपट्टीवरील मासेमारी नौकांतून मासळी उतरवण्याच्या ठिकाणी रस्ते, पाणी इत्यादी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात याव्यात. किनारपट्टी भागातील ग्रामपंचायती या मच्छीमार बांधवांना देण्यात येणाऱ्या सुविधा पुरवण्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. तरी या भागासाठी विशेष पॅकेज उपलब्ध करून देण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाला दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com