इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठवर

इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा आठवर

भिवंडी, ता. १ (बातमीदार) : भिवंडीतील इमारत दुर्घटनेत आज सकाळी आणखी दोन मृतदेह सापडले. त्यामुळे मृतांची संख्या आठवर गेली आहे. पोलिसांकडे कोणीही हरवल्याची तक्रार दाखल न केल्याने दुर्घटनेच्या तीन दिवसांनंतर एनडीआरएफच्या जवानांनी बचावकार्याची मोहीम थांबवल्याचे जाहीर केले.

भिवंडीतील वळ गावात वर्धमान कम्पाऊंडमध्ये गोदामाची इमारत कोसळल्याची घटना शनिवारी (ता. २९) दुपारी घडली होती. एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले होते. सोमवारी शेवटच्या दिवशी सकाळी अशोक मिश्रा (३२) व दिनेश तिवारी (३४) या दोन जणांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले. या रेस्क्यू टीमबरोबर डॉगस्कॉटदेखील कार्यरत होता. त्यामुळे या टीमला अडकलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी मदत होत होती. सोमवारी मिळालेल्या दोन मृतदेहानंतर मृतांची संख्या आठ झाली आहे. दरम्यान, नारपोली पोलिसांनी इमारत मालक इंद्रपाल पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक समाधान चव्हाण करीत आहेत.

तब्बल ४५ तास बचावकार्य
दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या जवानांचे बचाव पथक घटनास्थळी सतत तीन दिवस परिश्रम करत होते. त्यामुळे १० जणांना वाचवण्यात त्यांना यश आले. दोन दिवसांत पोलिसांकडे कोणी बेपत्ता अथवा हरवल्याची माहिती आलेली नाही, तसेच मिळवलेल्या माहितीनुसार सर्वांची ओळख पटवण्यात आली. त्यामुळे सोमवारी सकाळी तब्बल ४५ तासांनंतर हे बचाव कार्य थांबवल्याचे जाहीर केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com