Mantralaya
Mantralayasakal media

Mumbai : विकास कामांमध्ये राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग अग्रस्थानी

देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी फाटक बसवण्यात आले आहे. इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले.

पालघर - देशातील विविध राज्यांतील बांधकाम विभागापेक्षा महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम विभाग विकास कामांमध्ये अग्रस्थानी असल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. बांधकाम भवनाच्या नूतन इमारतीचे, तसेच रेल्वे फाटक क्र. ४७ अ कोळगाव येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

 Mantralaya
Mumbai Police : योगेंद्र आणि योगेश साटम यांच्या छायाचित्रांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव

देशात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. रेल्वे वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी फाटक बसवण्यात आले आहे. इतर वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले. कोळगावातील उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या मिटणार आहे. देशामध्ये दिवसाला ३६ किलोमीटर लांबीचा रस्ता तयार होत आहे. नवीन रस्ते निर्माण करण्यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असते.

स्थानिकांना विश्‍वासात घेऊन भूसंपादन करावे. विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकार निधी कमी पडू देणार नाही. नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकल्प येत्या काळात पूर्ण करणार असल्याचा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला.

या वेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, खासदार राजेंद्र गावित, सर्वश्री आमदार श्रीनिवास वनगा, सुनील भुसारा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com