मतदार संपर्क अभियान प्रभावीपणे राबविणार : दयानंद चोरघे

मतदार संपर्क अभियान प्रभावीपणे राबविणार : दयानंद चोरघे

Published on

भिवंडी, ता. १८ (बातमीदार) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यानुसार प्रदेश काँग्रेसने दिलेली मतदार संपर्क अभियान मोहीम प्रभावीपणे राबविणार असल्याचे ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी सांगितले.
ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व ब्लॉक अध्यक्षांची बैठक दयानंद चोरघे यांनी जिल्हा संपर्क कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत जिल्हा प्रभारी तथा मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी मार्गदर्शन केले. यावेभर बूथ कमिटीचा आढावा घेण्यात आला. प्रदेश काँग्रेसने बूथ कमिटी, ग्राम व प्रभाग कमिटी तयार करण्यासाठी मतदार संपर्क अभियान सुरू केले असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व ब्लॉकमध्ये बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे चोरघे यांनी सांगितले. भारत जोडो यात्रेनंतर जिल्ह्यात आयोजित केलेल्या ‘हात से हात जोडो’ अभियानात काँग्रेस कार्यकर्ते गावोगावी पोहचले असून मतदारांमध्ये काँग्रेससाठी अनुकूल वातावरण दिसून आले आहे. मतदार संपर्क अभियानातून बूथ बांधणीसह राज्य व केंद्र सरकारचे अपयश, वाढती महागाई, बेरोजगारी यावर आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे चोरघे यांनी सांगितले. या बैठकीस शहापूर तालुका अध्यक्ष महेश धानके, अंबरनाथ शहर अध्यक्ष प्रदीप पाटील, बदलापूर शहर अध्यक्ष संजय जाधव, भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष विजय पाटील, मुरबाड तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, कल्याण ग्रामीण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विरेन चोरघे आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.