व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाखांच्या खंडणीची मागणी

व्यापाऱ्याचे अपहरण करून ५० लाखांच्या खंडणीची मागणी

Published on

अंधेरी, ता. १० (बातमीदार) : अंधेरीतील एका व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याच्या अटकेसाठी सहाजणांच्या एका टोळीने सुमारे ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यांत व्यापाऱ्यासह त्याच्या आईला अटकेची धमकी देऊन या टोळीने त्यांचा मोबाईलसह सुमारे सव्वापाच लाखांची खंडणी वसुली केली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच कटातील मुख्य आरोपी दीपक जाधव (वाशिम) याला गुन्हे शाखेच्या वांद्रे युनिटच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

पीडित व्यापारी कुटुंबियांसोबत अंधेरी परिसरात राहत असून, ३० जूनला ते मैत्रिणीसोबत रेस्ट्रॉरंटमध्ये आले असता, त्यांचे सहाजणांच्या टोळीने अपहारण केले होते. आपण घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करून ते ड्रग्ज तस्करी करत असल्याचा आरोप केला. त्यांना ड्रग्जच्या गुन्ह्यांत अटक करण्याची धमकी देऊन ते सर्वजण रिक्षातून कोकीळाबेन अंबानी रुग्णालयाजवळ आले. त्यांचा मोबाईल घेतल्यानंतर त्यांनी जीपेद्वारे त्यांच्या बँक खात्यातून पाच लाख ३० हजार रुपये खंडणी वसुली केली. तसेच त्यांच्याकडे ५० लाख रुपयांची खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाहीतर त्यांना गोळ्या घालू अशीही धमकी दिली होती. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी वर्सोवा पोलिसांत तक्रार केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.