महामार्गही धोकादायक

महामार्गही धोकादायक
Published on

वसई (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर मुंबई, गुजरात, ठाणे परिसरात जाणारी वाहने सुसाट वेगाने प्रवास करत असतात, मात्र पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडल्याने हा मार्ग धोकादायक ठरत आहे. महामार्गावर भलेमोठ्या खड्ड्यांमुळे डबक्याचे स्वरूप निर्माण होऊ लागले आहे. वसई पुलाजवळ हे खड्डे दुर्घटनेला आमंत्रण देत आहेत.

काही दिवसांपूर्वी महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अतिक्रमण हटवा, असे निर्देश महापालिकेला दिले. त्यानंतर कारवाई करण्यात आली; परंतु रस्त्यांकडे अद्याप लक्ष देण्यात आले नसल्याने खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे कोंडीदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. अनेक वाहने विनाकारण अडकून पडत खोळंबा होत आहे. जीवनावश्यक साहित्य ने-आण करणाऱ्या वाहनांना कोंडीची झळ सहन करावी लागत आहे. पावसाळ्यात वसई, चिंचोटी, कामण, वर्सोवा पुलापर्यंत खड्डे दिसत आहेत. एकीकडे महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात. त्यातच पावसाळ्यात मार्गाची दुरवस्था निर्माण झाली असल्याने जर काही दुर्घटना घडली तर जबाबदार कोण, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.