दिघा स्थानकाच्या नावावर शिक्कामोर्तब

दिघा स्थानकाच्या नावावर शिक्कामोर्तब

Published on

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई, ता. २६ : आमदार गणेश नाईक यांनी केलेल्या अविरत पाठपुराव्यामुळे ऐरोली आणि ठाणे स्थानकांदरम्यान नव्याने बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकाचे नाव दिघा असे ठेवण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने मंजूर केला आहे. आता हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे जाणार असून त्यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर या स्थानकाचे दिघा असे नामकरण होणार आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी खासदार संजीव नाईक यांनी याबाबत माहिती दिली. याप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती अनंत सुतार, दिघा गाव येथील स्थानिक आणि स्थायी समितीचे माजी सभापती नवीन गवते, माजी नगरसेवक अशोक पाटील, माजी नगरसेविका उज्ज्वला झंजाड, समाजसेवक विकास झंजाड हे मान्यवर उपस्थित होते.
तत्कालीन खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी २०१२ मध्ये या स्थानकाची मागणी केली होती. त्या वेळेस आमदार गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. संदीप नाईक हे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार होते; तर स्थानिक नगरसेविका अपर्णा गवते या होत्या. डॉ. संजीव नाईक यांनी खैरणे, बोनकोडे आणि दिघा अशी दोन स्थानके निर्मिती करण्याची मागणी मंजूर करून घेतली होती. त्यापैकी दिघा स्थानकाला चालना मिळून हे स्थानक प्रत्यक्षात उतरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.