डोकेदुखीबाबतच्या जागरुकतेत वाढ

डोकेदुखीबाबतच्या जागरुकतेत वाढ

डोकेदुखीबाबतच्या जागरुकतेत वाढ
मुंबई : जागतिक महामारीनंतर स्वतःची काळजी घेण्याचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले आहे. महामारीनंतर निर्माण झालेली आव्हाने व अनिश्चिततांचा सामना करत असताना स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. नुकतेच न्यू सॅरिडॉन हेडेक अहवाल प्रकाशित करण्यात आला. यातून ही बाब ठळकपणे समोर आली आहे. यातून महामारीनंतर ८० टक्के व्यक्ती डोकेदुखीच्या त्रासाबाबत खुल्या मनाने मत व्यक्त होत आहेत; तर ५ पैकी ४ व्यक्तींनी डोकेदुखीपासून आराम मिळण्याकरिता काही मिनिटांमध्येच उपचार सुरू केले असल्याचे कबूल केले. तसेच या अहवालामधून व्यक्तींना महामारीनंतर येत असलेला तणाव समोर आला आहे. आरोग्यविषयक समस्या आणि कुटुंबांमधील वादविवादांनी तणाव पातळीमध्ये भर घातली आहे. हा तणाव व डोकेदुखीमध्ये संबंध असून जेथे ९३ टक्के व्यक्तींनी सर्वेक्षणात डोकेदुखीचा त्रास होत असल्याचे सांगितले. यामधून स्वतःची काळजी घेण्यासाठी सर्वांगीण दृष्टिकोन असण्याची गरज दिसून येते. महामारीनंतर सक्रिय सेल्फ केअरप्रती मोठा वर्तणूक बदल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com