Anna bhau Sathe
Anna bhau Sathe Sakal

लोकशाहीरांच्या ग्रंथ प्रकाशनासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे दूर्लक्ष, तीन महिन्‍यांपासून प्रतीक्षा; साहित्यिकांची खंत

मुंबई, ता. २४ ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीने प्रकाशनासाठी तब्बल तीन महिन्यांपूर्वी सादर केलेल्या चार खंडांच्या प्रकाशनासाठी प्रशासनाला वेळ मिळत नसल्‍याची खंत समितीसोबत विविध साहित्यिकांनी व्‍यक्‍त केली आहे. गेले तीन महिने समितीच्या सदस्यांकडून वारंवार या खंडाचे प्रकाशन करण्यासाठी विनंती केली जात असतानाही प्रशासनाकडून वेळच दिला जात नसल्‍याने आश्‍चर्य व्‍यक्‍त केले जात आहे.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने सामितीने २५ जुलैला उच्च शिक्षण विभागाच्या संचालकांकडे ‍अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवर आधारित ३ खंड आणि कथांवर आधारित १ अशा चार खंडांच्या आठ भागाचे ग्रंथ प्रकाशनासाठी पूर्ण करून ते सादर केले आहेत. त्या दिवसापासून आम्ही या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी वाट पाहात असल्याचे समितीचे सदस्य सचिव डॉ. संजय शिंदे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याची मोठ्या प्रमाणात कायमच मागणी असते. उच्च शिक्षण विभागाच्या अखत्‍यारीत असलेल्या समितीने जर तीन महिन्यांपूर्वी चार खंडाच्या आठ भागाचे प्रकाशन करण्यासाठी ग्रंथ तयार करून दिलेले असताना त्याचे प्रकाशन तेव्हाच करायला हवे होते. शिवाय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनीही त्याचे नेमके औचित्य साधता आले असते; परंतु, तीन महिन्यांत एकही दिवस या ग्रंथ प्रकाशनासाठी मंत्र्यांना मिळू नये, ही मोठी खेदाची बाब असल्याचे ज्येष्ठ साहित्यिक व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचे अभ्यासक चंद्रकांत वानखेडे यांनी सांगितले.

कार्यालयासाठी वनवास संपेना
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीच्या स्थापनेला पुढील वर्षी १० वर्षे पूर्ण होत असली, तरी या समितीला कार्यालयासाठी अजूनही जागा उपलब्ध करून देण्यात आली नाही. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी अनेकदा आश्वासनेही दिली असली, तरी त्याची अजूनही अंमबजावणी होऊ शकली नसल्याने सदस्यांना समितीच्या कामकाजासाठी पुण्यात जागा मिळेल तिथे बैठका घ्याव्या लागतात. या प्रश्‍नाकडेही दुर्लक्ष होत असल्याची खंत सदस्यांकडून व्यक्त करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी अनेकदा संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही; तर दुसरीकडे राज्याच्या इतक्या मोठ्या लोकशाहिराच्या ग्रंथ प्रकाशनाला तीन महिन्यांत मंत्र्यांना वेळ मिळू नये, ही मोठी शोकांतिका आहे.
– चंद्रकांत वानखेडे, ज्येष्ठ साहित्यिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com