भारत न्याययात्रा १४ मार्चला मोखाड्यात

भारत न्याययात्रा १४ मार्चला मोखाड्यात

मोखाडा, ता. १० (बातमीदार)ः देशभर भारत जोडो यात्रा काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची ‘भारत न्याय यात्रा’ सुरू आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वरमार्गे १४ मार्चला ही यात्रा मोखाड्यात येणार आहे.
देशातील मोदी सरकारच्या फसव्या योजना, तसेच शेतकऱ्यांच्या अन्यायकारक योजनांविरोधात सर्वसामान्यांना जागृत करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी ‘भारत न्याय यात्रा’ काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून गुरुवारी (ता. १४) राहुल गांधी मोखाडा येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधणार आहेत. या यात्रेच्या यशस्वितेसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोखाडा दौरा करून आढावा घेतला होता. तसेच आमदार सुनील भुसारा आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी तीनही तालुक्यांत बैठका घेतल्या आहेत. या यात्रेत २५ हजारांहून अधिक नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आमदार सुनील भुसारा यांनी दिली आहे.
------------------------------------------------------
आदिवासींशी साधणार संवाद
मोरचोंडी गावानजीक आमदार सुनील भुसारा यांच्या निवासस्थानाजवळील मोकळ्या जागेत राहुल गांधी यांचा मुक्काम असणार आहे; तर १५ मार्चला गांधी येथील आदिवासींशी संवाद साधणार आहेत. यावेळी चौकसभेत भाजप सरकारच्या फसव्या योजनांविषयी जागृती केली जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com