विद्यार्थ्यांनी लिहिले आई-बाबांना पत्र

विद्यार्थ्यांनी लिहिले आई-बाबांना पत्र

अंबरनाथ, ता. २८ (बातमीदार) : दर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदान नक्की करा, असे आग्रह धरणारे पत्र विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-बाबांना पाठवून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे.
मतदार जागरूकता अभियानांतर्गत अंबरनाथ येथील बाळवाडी भगिनी मंडळ शाळा क्रमांक एकच्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आई-बाबा, आजी-आजोबांना शाळेतून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पत्रे लिहिली आहेत. शाळेच्या सचिव मेघा आठल्ये आणि मुख्याध्यापिका प्रतिभा निपुरते, सहकारी शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. या शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान जनजागृती अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धा, मतदान गीत गायन, विद्यार्थ्यांची रॅली, घरोघरी मतदानाबाबत जनजागृती होणार आहे.

काय आहे पत्रात?
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा अधिकार आहे. लोकशाहीने अनेक सोयी-सुविधा आणि अधिकार नागरिकांना दिले आहेत. योग्य व्यक्तीला मतदान केल्यास देशाच्या विकासासाठी हातभार लागेल. नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून सार्वभौम आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीत योगदान द्यावे. १८ वर्षांवरील युवकांनी आणि नागरिकांनी विचारपूर्वक मतदानाचा हक्‍क बजवावा. मतदान करून शक्तिशाली राष्ट्र उभारणीसाठी सहकार्य करावे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे. मे महिना असला आणि शाळेला सुट्टी असली तरी मतदान करूनच यंदा गावाला जाऊ या, अशा आशयाची पत्रे विद्यार्थ्यांनी लिहिली आहेत. ही पत्रे पालकांना पोस्टाद्वारे पाठवली जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com