विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने तीन कामगारांचा मृत्यू

अंबरनाथ, ता. ४ (बातमीदार) ः विजेचा धक्का लागून तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथ येथे गुरुवारी (ता. ४) घडली. येथील बारवी जलशुद्धीकरण केंद्राच्या जमिनीत पाण्याची टाकी उभारण्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला. यात आणखी दोन कामगार जखमी झाले आहेत.

तालुक्यातील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पाण्याच्या टाकीचे काम सुरू आहे. यावर काही कामगार काम करत होते. गुरुवारी टाकीचे काम करताना साचलेले पाणी काढण्यासाठी पाण्याचा पम्प लावण्यात आला होता. त्यावेळी पम्प बंद पडल्याने तो सुरू करण्यासाठी सहा कामगार तो दुरुस्त करण्यासाठी गेले होते. त्यातील तिघांनी पम्प उचलण्याचा प्रयत्न केला, पण पम्पाला विजेचा पुरवठा सुरू असल्याने विजेचा धक्का लागून तीन कामगारांचा मृत्यू ओढावला, तर एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. दोघांनी पळ काढल्याने त्यांचा जीव वाचला. शालिग्राम मंडल (वय १८), गुलशन मंडल (वय १८) आणि राजन मंडल (वय १९) अशी मृत कामगारांची नावे आहेत. ते मूळचे बिहार राज्यातील रहिवासी होते. ठेकेदाराने काळजी न घेतल्याने हा प्रसंग ओढावल्याचा आरोप कामगारांच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिस पुढील तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com