Aditya Thackeray
Aditya Thackeraysakal

Aditya Thackeray: भाजपने गद्दारांना लायकी दाखवली; ठाकरेंचा शिंदेंना टोला

ठाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते |Mahavikas Aghadi candidate Rajan Vikhare


Thane News: मिंधे गटाला गुजरातमधून आदेश आला नसून, भाजप गद्दारांना उमेदवारी देईल, याबाबत साशंकता आहे. त्यामुळे गद्दार सेनेचे काय हाल झालेत, ते आपण बघत आहोत. भाजपने त्यांची लायकी दाखवून दिल्याची टीका ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केली.

ते ठाण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते.

Aditya Thackeray
Eknath Shinde : कॉँग्रेसने ६० वर्षे देशाला बुडविले ; शिंदे

ठाणे लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून राजन विचारे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सोमवारी (ता. २९) त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी महाविकास आघाडीच्यावतीने आनंद दिघे समाधीस्थळाचे दर्शन घेऊन मिरवणूक काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या मिरवणुकीत आदित्य ठाकरेही सहभागी झाले होते.

या वेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर टीका केली. मिंधे गँगला अजून गुजरातमधून तिकीट कोणाला द्यायचे, याबाबत आदेश आलेला नाही. त्यांना तिकीट मिळेल की नाही ही शंका आहे, असे ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray
Aditya Thackeray : भाजपने गद्दारांना त्यांची लायकी दाखवली; आदित्य ठाकरेंची टीका

तसेच आमच्याकडची गर्दी प्रेमाची आहे आणि प्रेमाच्या नात्याची माणसे आमच्याकडे आहेत. भाजप महाराष्ट्र आणि देश संपवायला निघाली आहे; परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. आम्ही आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच दिल्ली पुढे आम्ही झुकणार नाही, असेही ते म्हणाले. महाविकास आणि इंडिया आघाडी देशभरात अग्रेसर असून, आम्ही सर्वजण संविधानासाठी एकत्र आलो आहोत.

ज्या लोकांनी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न केला. आता हेच सगळे लोक महाराष्ट्र तोडू पाहत आहेत. हेच बाहेरचे लोक आम्हाला शिकवत आहे की शिवसेना काय आहे. पण, जनता त्यांना दाखवेल शिवसेना काय आहे. ४ जूनला ठाण्यात विजयाची मिरवणूक निघेल, असेही ते म्हणाले.

Aditya Thackeray
Aditya Thackeray : 'ज्यांनी दिली साथ त्यांचा केला घात, अशी भाजपाची वृत्ती

आव्हाडांकडून टीकास्त्र


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आजचा हा जमलेला जनसमुदाय बघता विजयाची रॅली वाटत असल्याचे उद्‍गार काढले. नरेंद्र मोदी हे भाषणात महत्त्वाचे मुद्दे बोलत नाही. १० वर्षे फक्त फसवणूक केली. त्यांनी विकासाचे विषय बाजूला ठेवले आहेत, अशी टीका केली. त्यानंतर एम. के. मढवीप्रकरणी त्यांनी पोलिसांना जाहीर आवाहन केले. सहा महिन्यांत सरकार बदलणार आहे. मर्यादेच्या बाहेर जाऊन वागाल तर, आम्ही लक्षात ठेवू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला.

Aditya Thackeray
Aditya Thackeray : खोटे बोला, पण रडून बोला ही शिंदेची सवय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com