बनावट संदेशापासून सावध राहा

बनावट संदेशापासून सावध राहा

ठाणे शहर, ता. १३ (बातमीदार) : निवडणुकीच्या काळात अफवा, फेक मॅसेज आदींना जणू पेव फुटलेले असते. अशा संदेश, अफवांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा आणि संदेशावर विश्वास न ठेवता त्याची संबंधित यंत्रणेकडून खातरजमा करून घ्यावी. कोणताही संदेश चौकशी, खातरजमा केल्याशिवाय इतरांना पाठवू नये, असे आवाहन जिल्हा माहिती तथा नोडल अधिकारी मनोज सानप यांनी केले आहे.
देशात लोकसभा निवडणुकीचा रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. अशा प्रसंगी काही समाजकंटक अशांतता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडून समाज माध्यमांचा वापर करत अफवा, फेक संदेश, चिथावणीखोर वक्तव्य, लोकशाहीला बदनाम करणारे संदेश, धार्मिक तेढ निर्माण करणारे लिखाण, ऑडिओ, व्हिडीओ पाठवले जात आहेत. कर्तव्यदक्ष नागरिकांनी याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक आहे. असे साहित्य आणि त्याबाबत खातरजमा न करता ते इतरांना पाठवू नये. तसे केल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असे आवाहन ठाणे जिल्हा माहिती अधिकारी तथा नोडल अधिकारी मनोज सानप यांनी मतदारांना केले आहे. सध्या अशाच प्रकारचा निवडणूक यादी संदर्भातील एक संदेश व्हायरल होत आहे. त्याची जिल्हा माहिती अधिकारी विभागाकडून खातरजमा केल्यानंतर तो फेक असल्याचे सानप यांनी कळवले आहे.

हाच तो फेक मॅसेज :
लोकसभा निवडणूक २०२४
महत्त्वाचा निरोप
ज्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. म्हणजेच यादीतील नावावर डिलिटेडचा शिक्का लागला आहे, त्या नागरिकांनी मतदान केंद्रावर अर्ज क्र. १७ भरावा. त्यानंतर मतदान कार्ड दाखवून मतदान करता येणार आहे. तरी विनंती आहे की, ज्यांची नावे यादीमध्ये दिसत नाहीत, त्यांनी मतदान केंद्रावर येऊन वरील प्रक्रिया पाडावी आणि आणि मतदानाचा हक्क बजवावा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com