उन्हाळ्यात स्थलांतर केलेले आदिवासी बांधव परतले

उन्हाळ्यात स्थलांतर केलेले आदिवासी बांधव परतले

उन्हाळ्यात स्थलांतर केलेले आदिवासी बांधव परतले
रसायनी, ता. ११ (बातमीदार) : रसायनीलगतच्या डोंगराळ भागातील आदिवासी बांधव उन्हाळ्यात उपजीविकेचे साधन अपुरे पडत असल्याने अन्‍यत्र स्‍थलांतर झाले होते. त्‍यामुळे येथील आदिवासी वाड्या ओस पडू लागल्‍या होत्‍या. मात्र, आता उन्‍हाळी भाजीपाल्‍याचा हंगाम संपत आल्‍याने पुन्‍हा आदिवासी बांधव आपल्‍या वाड्यांकडे परतू लागले आहेत.
रसायनी परिसरात सिंचनाचा आधार असलेले शेतकरी दुबारा भात आणि भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतात. लगतच्या माणिकगड, कर्नाळा किल्ल्याच्या डोंगर भागातील आदिवासी वाड्यांतील उन्हाळ्यात उपजीविकेचे साधन अपुरे पडत असल्याने आदिवासी बांधव वाड्या सोडून स्थलांतरित झाले होते. माडभवन, गायचरणी, तुळशीमाळ, मोदीमाळ, निफाडवाडी, खराबाचीवाडी, दोरेवाडी, पोसरीवाडी आदी वाड्यांतील अनेक आदिवासी कुटुंब स्थलांतरित झाले होते. रसायनी पाताळगंगा परिसरात नदी, धरण, विहीर आदी प्रकारच्या सिंचनाचा आधार असल्‍याने अनेक आदिवासी बांधवांनी शेतकऱ्यांची जमीन भाड्याने घेऊन त्‍यामध्ये उन्हाळी भाज्यांचे पीक घेतले. यामध्ये काकडी, शिराळी, घोसाळी, भेंडी यांचे मोठ्या प्रमाणावर पीक घेण्यात आले. तर पनवेल, वासांबे, मोहोपाडा बाजारपेठेत भाज्यांची विक्री करतात. दरम्यान, सध्या उन्हाळी भाज्यांचा हंगाम संपत आला असल्याने आदिवासी बांधव चार- पाच महिन्यांनंतर घरी परतू लागले आहेत. तर मोहोपाडा बाजारपेठेत परिसरातील भाज्यांची आवक कमी झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com