अतिसारावर मात करण्यासाठी पालिका सरसावली

अतिसारावर मात करण्यासाठी पालिका सरसावली

उल्हासनगर, ता. ५ (वार्ताहर) : पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमुख कारण म्हणजे बालपणातील अतिसार आहे. देशात सात टक्के बालकांचे मृत्यू हे अतिसारामुळे होतात. याची दक्षता घेण्यासाठी आणि अतिसारावर मात करण्यासाठी उल्हासनगर महापालिका सरसावली आहे. त्यासाठी सुकाणू समितीच्या बैठकीत योग्य त्या उपाययोजना करण्याचा निर्धार केला आहे.
सरकारने दिलेल्या सूचनांनुसार अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. राज्यात ६ ते २१ जून अतिसार नियंत्रण पंधरवडा राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत योग्य त्या उपाययोजना करण्याचा निर्धार सुकाणू समितीच्या बैठकीत करण्यात आला. आयुक्त अजीज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीत उपआयुक्त डॉ. सुभाष जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, शिक्षण विभागाचे अधिक्षक सतीश राठोड, डॉ. जॉन्सन राव, उत्कर्षा शिंदे, उज्ज्वला गीते, ऋतुजा, जोत्सना, मोनिका, शुभांगी उपस्थित होते. प्रत्येक शाळेत पालक सभा घेऊन या कार्यक्रमाची माहिती (ओआरएसचे महत्त्व, हात धुण्याची योग्य पद्धत) देणे, ओआरएस आणि झिंक व इतर औषधसाठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घेणे, आदींबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com