कवितेचा शोध घ्यायला हवा : कवी संजय चौधरी

कवितेचा शोध घ्यायला हवा : कवी संजय चौधरी

ठाणे (बातमीदार) : कविता या अवाख्य असतात. त्याच्या भावना प्रत्येकांसाठी वेगवेगळ्या असतात. जसा माणूस तशी त्याची कविता असते. जो कविता लिहितो त्याला ती सोपी की कठीण हे कळत असते. त्यामुळे आपणच स्वतः आपल्या कवितेचा शोध घ्यायला हवा, असे कवी संजय चौधरी यांनी व्यक्त केले. ठाण्यातील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या १३१ व्या वर्धापन दिनानिमित्त तीनदिवसीय कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी कवी प्रकाश होळकर आणि कवी संजय चौधरी यांची मुलाखत आणि कविता सादरीकरणाचा कार्यक्रम झाला. मुलाखतीत चौधरी यांनी, कविता जगातील सर्वांत लवचिक गोष्ट आहे. कविता ही आत्मस्वर आहे. प्रत्येकाची कविता मांडण्याची पद्धत, शैली ही वेगळी आहे. एखाद्या कवीची कविता ही त्याच्या आकलन शक्तीवर निर्माण होत असते. तुम्ही एखाद्या घटनेचा अनुभव कसा घेता याला फार महत्त्व आहे. एखादी घटना घडली की त्याचे प्रतिबिंब तुमच्या मनात कसे उमटते यावर कविता होते, असे म्हणाले. या वेळी कवी प्रकाश होळकर यांनी त्यांच्या महाविद्यालयातील काही अनुभव सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com