गायमुख घाटातून आज वाहतूक सुरू

गायमुख घाटातून आज वाहतूक सुरू

गायमुख घाटातून आज वाहतूक सुरू

ठाणे शहर, ता. ७ (बातमीदार) ः जड-अवजड वाहतुकीसाठी १४ दिवसांपासून बंद करण्यात आलेला गायमुख घाट अखेर शनिवार (ता. ८) सकाळपासून सुरू करण्यात येणार आहे. गायमुख घाटाचे काम शुक्रवारी (ता. ७) सायंकाळी पूर्ण झाले.
जर्मन तंत्रज्ञान वापरून घाटाचे ९१० मीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या कामामुळे आता घाटातील अपघातांचे प्रमाण कमी होऊन गाड्यांचा वेगदेखील वाढवता येणार आहे. घोडबंदर रोड हा वाहनांच्या वाहतुकीसाठी अतिशय व्यग्र मार्ग मानला जातो. या मार्गावरून नाशिक, पुणे, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी, मुंबई येथून मिरा-भाईंदर, अहमदाबादकडे जाता येते. त्यामुळे हलक्या प्रवासी वाहनांसोबतच जड-अवजड वाहनांची या मार्गावर गायमुख घाटात मोठी गर्दी असते. चढण्याचा भाग जास्त महत्त्वाचा असल्याने तो १४ दिवसांचा ब्लॉक घेऊन पूर्ण करण्यात आला. या काळात जड-अवजड वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली होती. आता ती नेहमीप्रमाणे त्यांच्या जुन्या मार्गाने सुरू करण्यात येणार आहे, असे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com