महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा मोर्चा

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Published on

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा मोर्चा
प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागाणी
मुंबादेवी, ता. ३ (बातमीदार) : विधिमंडळ अधिवेशनावर काढण्यात आलेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्यांचा मोर्चा मंगळवारी (ता. २) आझाद मैदान येथे धरणे आंदोलनात स्थिरावला. गेल्‍या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्‍या मागण्या सोडवण्याची मागणी आंदोलकांनी केली.
या मोर्चात अध्यक्ष अरुण निरभवणे, सरचिटणीस गजानन गटलेवार, कार्याध्यक्ष राजेंद्र शिंदे, साधना भगत यांच्यासह इतर पदाधिकारी सहभागी झाले होते. अरुण निरभवणे म्हणाले, २३ मार्च २०१७ च्या परिपत्रकानुसार वेतन व सेवानिवृत्ती वेतनाची जबाबदारी पूर्वी हे खाते शासनामध्ये असल्याकारणाने स्वीकारली. तसेच या खात्यातील कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा व राज्य शासनाचे सर्व नियम व अटी शर्ती या कर्मचाऱ्यांना लागू राहतील, असा जीआरमध्ये स्पष्ट उल्लेख होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला होता. सात वर्षांचा कालावधी होऊनदेखील अद्याप शासनाने या परिपत्रकाची परिपूर्ण अंमलबजावणी केली नसल्‍याने कर्मचाऱ्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित खात्याच्या मंत्र्यांची बैठक लवकरात लवकर लावून मागणीसंदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या मागण्यांबाबत गंभीरतेने विचार करून आम्हाला न्याय द्यावा. सायंकाळी आम्ही आमचे आंदोलन स्थगित करीत आहोत.
- अरुण निरभवणे, अध्यक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.