ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाला सुरुवात

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाला सुरुवात

Published on

ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे शेतकऱ्यांना कर्ज वाटप
विरार, ता. ६ (बातमीदार) : बँक आणि शासनपातळीवर शेतकऱ्यांना अनेक समस्या येत असतात, त्यामुळे या अडचणी एकाच ठिकाणी सोडवण्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून कृषीदिनानिमित्त बँक आपल्या दारी या संकल्पनेतून पीककर्ज वाटप मेळाव्यांचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांना चालू हंगामात जास्तीत जास्त पीककर्ज मंजूर होण्यासाठी ठाणे बँकेने हा उपक्रम राबवला. या कार्यक्रमाला बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. या पालघर व ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात खरीप हंगाम पीककर्ज वाटप मेळावे घेण्यात येत आहेत.
पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जांची माहिती देण्यासाठी बँकेच्या अध्यक्षांपासून महसूल अधिकारी, सहकार विभागाचे अधिकारी, शासनाचे कृषी अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. वसई, विक्रमगड तालुका, जव्हार तालुका, भिवंडी तालुका, कल्याण या तालुक्यातून खरीप पीककर्ज वाटप मेळावे घेण्यात आले आहे. यानिमित्ताने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण गोंधळी, राजेंद्र पाटील यांनी बँकेच्या कर्ज वाटप योजनेतून शेतकऱ्यांनी विविध व्यवसाय करून त्यांनी आर्थिक विकास साधावा, असे आवाहन केले.

विरार :
MUM24-E57598

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.