बळीराजाच्या स्वावलंबनासाठी फळझाडांचे वाटप

बळीराजाच्या स्वावलंबनासाठी फळझाडांचे वाटप

Published on

बोर्डी, ता. ८ (बातमीदार) : मागील पाच दशकांपासून नरेशवाडी येथील श्री गिरीवनवासी प्रगती मंडळाकडून डहाणू तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. या सामाजिक संस्थेच्या वतीने वृक्षारोपणासाठी परिसरातील शेतकऱ्यांना विविध जातीच्या झाडांच्या ५०० रोपाचे वितरण करण्यात आले. कुटुंबातील व्यक्तींच्या आहारात फळांचा आणि भाजीपाल्याचा समावेश व्हावा, तसेच शेतकऱ्याला फळ आणि भाजीपाला लागवडीसाठी प्रवृत्त करावे, त्याला स्वावलंबी बनवावे, उत्पन्नातून स्वत:ची गरज भागवून उरलेले बाजारात विकून घर खर्चसाठी हातभार लागावा असा आहे, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


मागील वर्षी एक हजार फळझाडांची रोपे संस्थेमार्फत मोफत वाटप करण्यात आली होती. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्षात त्यांची पाहणी करण्यात आली. तसेच व्यवस्थित जपणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने आंबा, जांभूळ, फणस यासारख्या ५०० झाडांचे वाटप करण्यात आले. सोबतच परसबागेमध्ये लागवडीसाठी वेलवर्गीय भाजीपाला पिकांचे बियाणे वाटप करण्यात आले. या योजनेमध्ये फळरोपे वाटप करण्यापासून ते झाड उत्पन्न देईपर्यंत संस्था शेतकऱ्यांना मार्गदर्शन व साह्य करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.