एक रुपयात हेक्टरी ५० हजारांची विमा सुरक्षा

एक रुपयात हेक्टरी ५० हजारांची विमा सुरक्षा

Published on

पालघर, ता. ८ (बातमीदार) : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. फक्त एक रुपया शेतकरी हिस्सा भरून सर्वसमावेशक पीक विमा योजना पालघर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

पालघर जिल्ह्यात भात, नाचणी व उडीद ही पिके योजनेंतर्गत अधिसूचित आहेत. या पिकांसाठी निर्धारित केलेल्या पीक विमा हप्त्याच्या शेतकरी हिश्श्याच्या अनुक्रमे रक्कम १०३५.३०, ४०० व ५०० रुपयांपैकी फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. उर्वरित शेतकरी हिश्श्याची रक्कम राज्य सरकार भरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना १५ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे.

या योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याने आपला सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज घेऊन हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी. सी. एस. सी केंद्रात आपले सरकार पोर्टलच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभागी होऊ शकता किंवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे साह्य घेऊ शकता. अधिक माहितीसाठी नजीकच्या तालुका कृषी अधिकारी, कार्यालय, विमा कंपनी प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.