वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास

वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास

Published on

अकरा चाळीतील ८४२ रहिवाशांची सदनिकानिश्चिती
- दीड वर्षात मिळणार घराचा ताबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाकडून ४० मजल्यांच्या गगनचुंबी इमारती उभारल्या जात आहेत. त्यामध्ये लवकरच रिकाम्या केल्या जाणाऱ्या अकरा चाळींतील ८४२ पात्र गाळेधारकांना कुठे सदनिका मिळणार, याची निश्चिती म्हाडाने केली आहे. त्यांना पुढील दीड वर्षात म्हणजे डिसेंबर २०२५ पर्यंत घराचा ताबा मिळू शकणार आहे.
म्हाडाच्या माध्यमातून वरळीच्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मे. टीसीसी कंस्ट्रक्शन कंपनीमार्फत वरळीतील १२१ चाळींचा पुनर्विकास करून नऊ हजार ६८९ सदनिका उभारण्यात येणार आहे. वरळी बीडीडीतील १८-२०, ५९-६१ आणि ७८-८२ या अकरा चाळींमध्ये वास्तव्यास असलेल्या ८४२ रहिवाशांची नुकतीच म्हाडातर्फे सदनिका निश्चिती करण्यात आली. इमारतींचे काम सुरू असतानाच म्हाडाने सदनिकांची निश्चिती केल्याने आपल्याला कोणत्या मजल्यावर कुठे घर मिळणार, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चाळी रिकाम्या करण्यास रहिवाशांचा चांगला प्रतिसाद मिळणार आहे.

करारनामा लवकरच
सदनिकांची निश्चिती झाल्यानंतर आता या रहिवाशांसोबत करारनामा केला जाणार असल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्याने दिली. तसेच रहिवाशांना भाड्याचा किंवा संक्रमण शिबिराचा पर्याय देऊन अकरा चाळी रिक्त केल्या जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.