शाळेतून काढण्याच्या भीतीने आत्महत्या

शाळेतून काढण्याच्या भीतीने आत्महत्या

Published on

कल्याण, ता. ११ (वार्ताहर) : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने शाळेतून काढून टाकण्याचा इशारा देत अकरावीतील काही विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आले होते. हा प्रकार घरच्यांना कळेल, या भीतीने एका विद्यार्थ्याने घरात गळफास घेतल्याचा प्रकार कल्याण तालुक्यातील निंबवली गावात घडला. याप्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा दाखल आहे.
कल्याणजवळील एका नामांकित शाळेचा विद्यार्थी असलेला अनिष अकरावीत शिकत होता. दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर इतर तीन मित्रांसमवेत त्याने काही आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. ही गोष्ट कळताच त्याला शाळेतून काढून टाकण्याचा इशारा देत शाळा प्रशासनाने घरी पाठवले होते; पण या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या अनिषने घरातील गच्चीतच गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर मुलांची वर्तणूक सुधारावी, यासाठी ताकीद दिलेली होती; पण कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्टीकरण शाळा प्रशासनाने दिले आहे. या प्रकरणी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आला आहे; पण विद्यार्थ्याचे कुटुंबीय काय तक्रार देतात, त्यानुसार पुढची कारवाई होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.