रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू

रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू
Published on

रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू

उल्हासनगर, ता. ९ (बातमीदार) ः उल्हासनगर व अंबरनाथच्या दरम्यान उल्हासनगरातील एका २५ वर्षीय तरुणाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. रोहित मगर असे मृत्युमुखी पडलेल्या अविवाहित तरुणाचे नाव असून, तो सम्राट अशोकनगरमध्ये राहत होता. रोहित मंगळवारी (ता. ८) उल्हासनगरात येण्यासाठी अंबरनाथवरून लोकलने प्रवास करत होता. त्या वेळी कानसई एमपी गेटसमोर लोकलमधून पडून त्याचा मृत्यू झाला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रोहितवर अंतिम संस्कार करण्यात आले. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com