पालघरमध्ये आजपासून विशेष स्वच्छता अभियान

पालघरमध्ये आजपासून विशेष स्वच्छता अभियान

Published on

पालघर (बातमीदार) : राज्य सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात ‘कंपोस्ट खड्डा भरू, आपले गाव स्वच्छ ठेवू!’ हे विशेष स्वच्छता अभियान उद्या (ता. १ मे)पासून राबवले जाणार आहे. या अभियानाची सुरुवात कोळगाव येथे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानाचा उद्देश ग्रामीण भागात ओल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करून कंपोस्ट व गांडूळ खतनिर्मिती करणे आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा दोनअंतर्गत ग्रामस्थांनी नियोजनबद्ध वापर करून आपले गाव कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावे. या अभियानात प्रत्येक ग्रामस्थाने सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. १ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबवले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com